Saturday, 18 February 2017

प्रेम त्याच्यावरच करा जो आपल्यावर प्रेम करतो

एक कीर्ती नावाची मुलगी सुमित वर खूप प्रेम करयाची. पण सुमित ला हे माहित नव्हते. कीर्ती आणि सुमित चांगले मित्र मैत्रीण होते. सुमित सरितावर प्रेम करायचा आणि तो सरिता बद्दल कीर्ती ला सांगायचा. कीर्ती ला खूप वाईट वाटयचे. तिला माहित होते की तिचे पहिले प्रेम कधीच पूर्ण होणार नाही. पण काही महिन्यानंतर सरिता सुमित ला सोडून जाते. सुमित खूप दु:खात जगत होता. कीर्ती त्याला हसवण्याचा प्रयत्न करायची पण तो नेहमी दुखीच रहायचा. तरी ही कीर्ती त्याला हसवण्याच्या प्रयत्नात होती. सुमित ला सरिता सोडून गेली याचा तिला आनंद न होता. तो तिच्या दुखात आहे ह्याचा तिला त्रास होत होता. ती त्याला धीर द्यायची.

कीर्ती चे हे प्रयत्न पाहून सुमित ला ही कीर्ती आवडायला लागली. कीर्ती ने एकदा धाडस करून सुमित ला विचारले. मला तू आवडतोस माझ्याशी लग्न करशील. सुमित ला ही कीर्ती आवडायला लागली होती म्हणून त्याने ही होकार दिला. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले.

सरिता परत सुमितच्या आयुष्यात येते आणि त्याला बोलते आता आपण लग्न करूया. तेव्हा सुमित तिला नकार देतो. तो तिला म्हणतो ज्या वेळी मला तुझी जास्त गरज होती त्यावेळी तू मला साथ नाही दिलीस. आता मी फक्त कीर्ती वर प्रेम करतो. सरिता कीर्ती ला जाऊन भेटली. ती तिला म्हणली की, "सुमित आणि माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे. तर तू नक्की ये" हे ऐकून कीर्ती ला धक्का बसला तिने मनात विचार केला की, सुमित ने वेळ घालवण्या करिता माझ्यावर प्रेम केले होते आणि ती त्याला न विचारता तिच्या गावी जाते. सरिताला चांगली संधी मिळते आणि ती सुमित ला सांगते की कीर्ती तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत पळून गेली. सुमित तुटून जातो. त्याला ही असे वाटते की, कीर्ती ने वेळ घालवण्या करिता माझ्यावर प्रेम केले. पण तो हार मानत नाही तो तिला शोधतो. कारण त्याला ती हवी असते. त्याला वाटते की पहिले प्रेम पूर्ण नाही झाले पण मी माझे दुसरे प्रेम नक्की पूर्ण करणार.  एके दिवशी त्याच्या मित्र त्याला सांगतो की ती आमच्या गावात राहते. तेव्हा तो तिच्या गावात जातो आणि जेव्हा तिला तो दिसतो तेव्हा ती रागाच्या नजरेने त्याला बघून त्याच्या समोरून जाते. तो तिला थांबण्याच्या पर्यंत करतो. तो तिला म्हणतो, "काय झाल अचानक सोडून का गेलीस? माझे प्रेम अपुरे पडले का जे दुसऱ्या सोबत पळून आलीस.” ती त्याला म्हणते की, "तू हे स्वतः केलेस आणि मला सांगतोस”. तो म्हणतो, "मी कधी केले. तूच अर्ध्यावर सोडून आलीस.” अशा वादावादीत त्यांना कळते की हे सगळं सरिताने केले. तेव्हा दोघांच्या ही डोळ्यात अश्रू येतात. तेव्हाच दोघे एकमेकांना वचन देतात कोणीही मधी आले तरी आपण एकमेकांत असलेला विश्वास तुटू द्यायचा नाही.


साभार :- मिष्टी जानु

Post #15

No comments:

Post a Comment